शेतकरी बंधुनो मागच्या वर्षी म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या मोठया प्रमाणावर अतिवृष्टी मध्ये आपल्या बळीराजाचे खूप नुकसान झाले आहे. बळीराजाच्या हाता तोंडाशी आलेला घास या अतिवृष्टीने हिरावून घेतला होता. त्यावेळी या सरकारने या झालेल्या पावसाने नुकसान भरपाई म्हणून सरसकट 13 हजार रुपये एवढे अनुदान आपल्या बळीराजाला देण्याचे जाहीर केले होते. पण हे अनुदान फक्त कागदावर च दिले गेले ( कागदोपत्री दिल्याचे आहे ) प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यावर पैसे आलेच नाही.
पाथर्डी ( अहमदनगर ) येथील शेतकऱ्यांबाबत प्रकार घडला. तेथील तहसीलदारांकडे या अनुदान संदर्भात विचारणा केली असता, हे अतिवृष्टी अनुदान जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेच नाही.याआधी तुम्हाला माहित असेल की हे अनुदान तहसील मधून संबंधित गावाच्या बँकांना पाठवून तेथील शेतकऱ्याच्या यादी सोबत तसेच अनुदान किती आहे ही सर्व माहिती पाठवली जायची व अनुदान त्या प्रमाणे जमा होत असे. आता या जुन्या प्रणालीत बदल झाला असून हे अनुदान संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागले. त्यामुळे हे अनुदान कोणाच्याही खात्यात व कोठेही जमा होऊ लागले. अनेक शेतकरी या अतिवृष्टी अनुदानापासून वंचित राहु लागले.
शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की हे अनुदान जिल्हाधिकारी यामार्फत देण्याऐवजी ते पूर्वी प्रमाणे म्हणजे जुन्या पद्धतीने दिले जावे. तसेच सर्व बाधित शेतकऱ्यांना हे अनुदान दिले जावे.
– शासन माहिती प्रमाणे अतिवृष्टी अनुदान साधारण हे ऑगस्ट 2023 पासून आधार लिंक खात्यावर जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे, त्यासाठी आवश्यक ती Ekyc केली जाणार आहे असे सांगितले जात आहे.
Solar Pump Yadi 2024 : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान म्हणजे पीएम कुसुम…
नमस्कार, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही मजेशीर असतात काही प्रेरणादायी…
सीबीआयआयल स्कोर कसा पहायचा cibil score check free | cibil score check | cibil score check free…
driving licence online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट…
आगामी अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा…
Ujwala 3.0 Gas : नमस्कार, केंद्र सरकार मार्फत नुकतीच उज्वला 3.0 याची सुरुवात करण्यात आली…
View Comments
Kadhi jama honar